Important Dates in History for Maharashtra SSC
When we was child it was seem very hard to remember each year and the important event took place in that respective year in History book. So we have made this page for our students of Maharashtra State Board. We have made this page with complete list of Maharashtra Class 10 History – Important Dates with details. Students will happy by this page.
ई. स. पू 5 वे शतक :-
इसवी सन पूर्व 5 व्या शतकात हिरोडोटस हा इतिहासकार होऊन गेला. या ग्रीक इतिहासकाराने द हिस्टरीज हा ग्रंथ लिहिला. म्हणजेच हिस्टरी हा शब्द ग्रीक भाषेतील आहे.
ई. स. 18 वे शतक :-
इसवी सन अठराव्या शतकात युरोपमधील तत्त्वज्ञान आणि विज्ञान या दोन क्षेत्रांमध्ये सुद्धा उत्तरोत्तर प्रगती होत गेली होती. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक घटनांचा सुद्धा अभ्यास करता येईल अशी आशा विचारवंतांना वाटू लागली.
ई. स 1837:-
इसवी सन 1837 मध्ये जर्मनीत गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली या विद्यापीठाची स्थापना झाल्यामुळे इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान निर्माण झाले.
इसवी सन 1596 ते इसवी सन 1650:-
इसवी सन 1596 ते इसवी सन १६५० यामध्ये रेने देकार्त या फ्रेंच तत्त्वज्ञ इतिहासकाराने इतिहास लेखनासाठी कोणता कागद वापरला गेला आहे यावर संशोधन केले जाणे आवश्यक आहे असे मत मांडले. त्याने डिस्कोर्स ऑन द मेथड हा ग्रंथ लिहिला.
इसवी सन 1694 ते इसवी सन 1778:-
इसवी सन 1694 ते इसवी सन 1778 या काळात व्हॉल्टेअर याने इतिहास लेखन केले. इतिहासामध्ये मानवाच्या संपूर्ण जीवनाची मांडणी केली जाते. हा त्यांचा विचार होता. म्हणूनच व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासाचा जनक असे म्हटले जाते.
इसवी सन 1770 ते इसवी सन 1831:-
जॉर्जविल्हेम फ्रेडरिक हेगेल यांनी रिझन इन हिस्टरी हे पुस्तक लिहिले. ते जर्मन तत्वज्ञाते होते. तसेच इनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या त्यांच्या ग्रंथांमध्ये त्यांची व्याख्याने आणि लेख समाविष्ट केले गेले आहेत.
इसवी सन 1795 ते इसवी सन १८८6:-
लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा एकोणिसाव्या शतकातील इतिहास लेखनावर प्रभाव होता. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्टरी आणि द सीक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्टरी या दोन ग्रंथांमध्ये त्यांचे विविध लेख समाविष्ट केले गेले आहेत.
इसवी सन 1818 ते इसवी सन 1883:-
इसवी सन १८१८ ते इसवी सन १८८३ या कालखंडात काल मार्क्स यांनी अनेक सिद्धांत मांडले. माणसाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. यावर आधारित दास कॅपिटल हा ग्रंथकार मार्क्स यांनी लिहिला आहे.
इसवी सन 1990 नंतर:-
इसवी सन 1990 नंतर स्त्रीवादी इतिहास लेखनात सुरुवात झाली. सीमाँ-द-बोव्हा हिने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग आहे असे मानण्यास सुरुवात झाली.
इसवी सन 1926 ते इसवी सन 1984:-
इसवी सन 1926 ते इसवी सन 1984 या कालखंडात मायकेल फुको हे फ्रेंच इतिहासकार म्हणतात की इतिहासामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळात विविध स्थित्यंतरे होत असतात. या स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी ‘आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज’ हा ग्रंथ सुद्धा लिहिला.
इसवी सन 1817:-
इसवी सन 1817 रोजी जेम्स मिल यांनी लिहिलेल्या द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे तीन खंड प्रसिद्ध झाले.
इसवी सन 1841:-
इसवी सन 1841 मध्ये द हिस्टरी ऑफ इंडिया हा ग्रंथ माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी लिहिला.
इसवी सन 1922 ते इसवी सन 1937:-
इसवी सन 1922 ते इसवी सन 1937 यामध्ये भारतीय इतिहासाचे ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्म प्रसारकांनी भारतीय संस्कृती कशी गौण दर्जाची आहे इतिहास लेखन केलेले दिसते. हे त्यांच्या लेखनात स्पष्टपणे दिसून येते. 1922 ते इसवी सन 1937 मध्ये केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया हा ग्रंथ प्रसिद्ध झाला होता.
इसवी सन 1784:-
इसवी सन 1784 मध्ये कोलकत्ता येथे सर विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ची स्थापना केली. यामध्ये प्राचीन भारतीय वांग्मय आणि त्याचा इतिहास यांच्या अभ्यासाला चालना देण्यात आली.
फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांनी हितोपदेश हा संस्कृत ग्रंथाचा अनुवाद त्यांनी जर्मन भाषेत केला. ऋग्वेदाचा सुद्धा त्यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला. याचप्रमाणे द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले.
19 वे तसेच 20 वे शतक:-
भारताबद्दल पूर्वगृह दूषित जो इतिहास होता या इतिहासाला विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी विरोध केला. त्यांनी भारतातील इतिहासातील सुवर्णकाळ शोधून काढण्याचा प्रयत्न केला.
7 जुलै 1910:-
7 जुलै 1910 रोजी विका राजवाडे यांनी पुण्यात भारतीय संशोधनाच्या कार्यासाठी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस 1857 हे पुस्तक लिहिले.
इसवी सन 2012:-
युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश केला गेला. या घाट रांगांमधील सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचे कार्य भारत सरकार व राज्य शासनाचे पुरातत्त्व खाती करत असतात. 1984 पासून इनटॅक ही स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात कार्यरत आहे.
इसवी सन पूर्व सहावे शतक:-
मेसोपोटेमियातील ‘उर’ या प्राचीन शहराचे उत्खनन करताना जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे संग्रहालय सापडले. एनिगॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येने या संग्रहालयाचे बांधकाम केले होते. तसेच ती संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम पाहत असे. 1922 ते 1943 या काळात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर लिओनार्ड वुल यांनी हे उत्खनन केले होते.
इसवी सन 1814:-
कोलकत्ता येथे इंडियन म्युझियम यांची एशियाटिक सोसायटी तर्फे स्थापना.
नॅथानिएल वॉलिक हे डॅनिश हे तेथील वनस्पती शास्त्रज्ञ तसेच संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते.
सन 1964:-
पुण्यामध्ये नॅशनल फिल्म अर्काइव्ह’ या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा माध्यम विभाग म्हणून त्याची स्थापना करण्यात आली.
भारतीय कलांचा इतिहास
आपल्याला जे अनुभव येतात त्यातून आपल्याला काही ज्ञान प्राप्त होते. तसेच ते ज्ञान आणि भावभावना सर्व लोकांपर्यंत पोहोचावे ही प्रत्येक व्यक्तीची प्रवृत्ती असते. या प्रवृत्तीच्या माध्यमातूनच एखादी सौंदर्य पूर्ण निर्मिती केली जाते. त्याला कला असे म्हणतात.
इसवी सन 1857:-
मुंबईमध्ये सन १८५७ मध्ये जे जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या कला शाळेची स्थापना करण्यात आली. यामधून अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला आले यातीलच पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्या मधील चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचे कार्य केले.
29 जानेवारी 1780 :-
पहिले इंग्रजी वर्तमानपत्र भारतामध्ये ‘कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर’ किंवा ‘बेंगॉल गॅझेट या नावाने 29 जानेवारी 1780 रोजी सुरू करण्यात आले.जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने ते सुरू केले.
सन 1832 :-
बाळशास्त्री जांभेकर यांनी सन 1832 मध्ये दर्पण हे पत्र सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर यांना आद्यासंपादक असे म्हटले जाते.
6 जानेवारी:-
6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कारण ते पहिल्या मराठी पत्राचे संपादक होते.
सन 1842 व सन 1881:-
सन 1882 पत्रात आशिया खंडाचा व सन 1881 मध्ये युरोप खंडाचा नकाशा ज्ञानोदय मध्ये छापण्यात आला.
सन 1882:-
सन 1882 पासून विजेच्या साहाय्याने बातमी पोहोचवणारे यंत्र टेलिग्राफ सुरू झाले.
सन 1857 :-
सन 1857 च्या स्वातंत्र्य लढ्याच्या बातम्या ज्ञानोदय या वर्तमानपत्रात छापून येत.
सन 1881:-
सन 1881 मध्ये लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली.
सन 1929:-
सन 1928 मध्ये संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी प्रगती या साप्ताहिकाचे संपादन करण्यास सुरवात केली.
सन 1924:-
सन 1924 मध्ये ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ हे दरोरोज कार्यक्रमांचे प्रसारण करणारे खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले.
6 जून 1936 :-
6 जून 1936 रोजी ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी’ या कंपनीचे नामकरण ‘ ऑल इंडिया रेडिओ ‘ असे करण्यात आले.
23 जुलै 1927:-
भारतातले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटीन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले.
15 सप्टेंबर 1959:-
भारत दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केले.
1 मे 1972:-
1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू झाले.
सन 1982:-
रंगीत दूरदर्शनचे आगमन सन 1982 रोजी झाले.
सन 1991:-
सन 1991 रोजी केबल तंत्राच्या माध्यमातून परदेशी आणि देशी खाजगी वाहिनांना कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली.
सन 2014:-
सन 2014 मध्ये पहिल्या महायुद्धाला शंभर वर्षे पूर्ण झाली.
सन 2017:-
सन 2017 मध्ये चले जावया आंदोलनाला 75 वर्षे पूर्ण झाली.
सन 1861:-
सन 1861 मध्ये वि. ज. कीर्तने यांनी थोरले माधवराव पेशवे हे नाटक लिहिले. हे नाटक मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असणारे पहिले नाटक होय.
सन 1912:-
सन 1912 मध्ये परदेशी तंत्रज्ञाचे सहाय्य घेऊन पुंडलिका कथा पट मुंबईत दाखवला गेला.
सन 1913:-
सन 1913 रोजी दादासाहेब फाळके यांनी स्वतः दिग्दर्शित केला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला. या चित्रपटाच्या संदर्भातील सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण केल्या गेल्या होत्या.
सन 1918:-
सन 1918 मध्ये सैरांध्री चित्रपट आनंदराव पेंटर आणि त्यांचे मावस बांधून बाबुराव पेंटर तथा मिस्त्री यांनी काढला.
सन 1925:-
सन 1925 मध्ये ब्रिटिशांनी बालाजी पेंढारकरांच्या ऐतिहासिक चित्रपटांवर निर्बंध घातले. कारण या चित्रपटांमधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होत आहे हे ब्रिटिशांच्या लक्षात आले.
सन 1944:-
प्रभात कंपनीचा राम शास्त्री हा चित्रपट सन 1944 मध्ये गाजला
खेळ आणि इतिहास
सन 1936:-
भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिक मध्ये सन 1936 रोजी सुवर्णपदक जिंकले.
सन 1928 आणि सन 1932:-
सन 1928 आणि सन 1932 मध्ये भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदे जिंकली होती.
29 ऑगस्ट:-
29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस. हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. हॉकीचे जादूगार असेही त्यांना म्हणतात.
सन 1956:-
मेजर ध्यानचंद यांना सन 1956 मध्ये हॉकीतील कामगिरीबद्दल पद्मभूषण या सन्मानांने सन्मानित करण्यात आले.
इसवी सन 630:-
इसवी सन 630 मध्ये युआन श्वांग हा चिनी प्रवासी भारतात आला होता.
सन 1159 ते सन 1173:-
बेंजामिन ट्युडेला हा जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी. सन 1159 ते सन 1173 मध्ये त्याने इजिप्त, इराक, भारत, इटली, ग्रीस, पर्शिया, चीन या देशांना भेटी दिल्या.
इसवी सन 1857:-
विष्णुभट गोडसे यांनी सन 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामा मध्ये महाराष्ट्रातून अयोध्येपर्यंत आणि पुन्हा महाराष्ट्रा पर्यंत प्रवास केला.
इसवी सन 1975:-
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना इसवी सन 1975 मध्ये करण्यात आली यामुळे पर्यटनच्या व्यवसायाच्या विकासाला चालना मिळाली.
इसवी सन 1846:-
इसवी सन १८४६ मधील अमेरिकेत नैसर्गिक इतिहासाचे संग्रहालय स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली सुरू करण्यात आले.
इसवी सन 1814:-
एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन १८१४ मध्ये कोलकत्ता येथे भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय स्थापन करण्यात आले.
इसवी सन 1851:-
चेन्नई येथे भारतातील दुसरे संग्रहालय गव्हर्मेंट म्युझियम इसवी सन 1851 मध्ये स्थापन करण्यात आले.
इसवी सन 1949:-
दिल्ली येथे राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाची स्थापना इसवी सन 1949 मध्ये करण्यात आली.
इसवी सन 1904:-
मुंबईतील काही नागरिक आहे एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्स यांनी भारत भेट दिली याच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय इसवी सन 1904 मध्ये घेतला.
इसवी सन 1905 :-
मुंबईत उभारण्यात येणाऱ्या वस्तुसंग्रहालयाची पायाभरणी इसवी सन 1905 च्या नोव्हेंबर महिन्यात झाली.
इसवी सन 1998:-
‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया’ या संग्रहालयाचे नाव बदलून इसवी सन 1998 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय असे नाव ठेवण्यात आले.
इसवी सन 1675:-
व्यंकोजीराजे भोसले यांनी त्यांच्यावर जिंकून स्वतःचे स्वतंत्र राज्य इसवी सन 1675 मध्ये स्थापन केले.
इसवी सन 1918:-
इसवी सन 1918 मध्ये सरस्वती महाल ग्रंथालय यांचे नाव बदलून सरफोजी राजे भोसले यांच्या सन्मानार्थ या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले.
इसवी सन 1891:-
इम्पेरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने सन 1891 मध्ये भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार कोलकत्ता येथे स्थापन करण्यात आले.
इसवी सन 1911:-
कोलकत्ता येथे स्थापन करण्यात आलेले पहिले सरकारी अभिलेखागार इम्पेरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट हे इसवी सन 1911 मध्ये दिल्लीमध्ये आणले गेले.
इसवी सन 1998:-
भारताचे राष्ट्रपती की आर नारायण यांनी इसवी सन 1998 मध्ये राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून जनतेसाठी खुले करण्यात आले आहे असे सांगितले. या अभिलेखागारांमध्ये इसवी सन 1748 पासून ची कागदपत्रे क्रमवार लावून ठेवली आहेत.
इसवी सन 1767:-
इसवी सन 1767 मध्ये इन सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका हा कोर्स प्रथम प्रसिद्ध झाला.
इसवी सन 1932:-
भारत वर्षीय प्राचीन चरित्रकोश संपादून प्रसिद्ध.
इसवी सन 1937:-
भारत वर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश संपादून प्रसिद्ध.
इसवी सन 1946:-
भारत वर्षी अर्वाचीन चरित्रकोश संपादून प्रसिद्ध.
26 जानेवारी 1950:-
26 जानेवारी 1950 पासून भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली.
इसवी सन 1950:-
निवडणूक आयोगाची स्थापना इसवी सन 1950 मध्ये करण्यात आली त्यानंतर त्यांना निवडणूक आयुक्तांचा पदभार दिला गेला.
25 ऑक्टोबर 1951:-
25 ऑक्टोबर १९९१ रोजी हिमाचल प्रदेश येथे राहणाऱ्या श्याम शरण्ये ही आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणारे हे पहिले मतदार ठरले.
इसवी सन 1951- 52:-
इसवी सन 1951- 52 मध्ये स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक पार पाडण्यात आली.
इसवी सन 1990:-
इसवी सन 1990 च्या दशकापासून इलेक्ट्रॉनिक मशीन मतदानासाठी वापरण्यात येऊ लागल्या.
8 ऑक्टोबर 2010:-
निवडणूक आयोगाने 8 ऑक्टोबर 2010 रोजी तज्ञांचा समावेश असलेल्या एका समितीची स्थापना केली व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदाराची पडताळणी पावती ही सुविधा समाविष्ट करण्याचे ठरले.
सन 1977:-
सन 1977 मध्ये काँग्रेस इतर पक्षांनी एकत्र येऊन एका प्रबळ पक्ष पद्धतीला आव्हान दिले.
सन 1989:-
राजकारणात एकाच पक्षाचे वर्चस्व असणे ही बाब सण 1989 च्या निवडणुकीनंतर संपुष्टात आली व अनेक पक्षांनी एकत्र येऊन शासन स्थापन करण्यास सुरुवात झाली.
सन 1885:-
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सन १८८५ मध्ये झाली.
सन 1925:-
सन 1925 मध्ये मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली.
1960 चे दशक:-
चीन व सोव्हिएट युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारावे यावरून सण 1960 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षातील नेत्यांमध्ये मतभिन्नता निर्माण झाली यामुळे पक्षात फूट पडली.
सन 1964:-
भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूटपाडी त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष ( मार्क्सवादी) हा सन 1964 मध्ये स्थापन करण्यात आला.
सन 1951:-
सन 1951 मध्ये भारतीय जनसंघ हा पक्ष स्थापन करण्यात आला.
सन 1977:-
सन 1977 मध्ये जनता पक्ष स्थापन करण्यात आला व त्यामध्ये भारतीय जनसंघ विलीन झाला.
सन 1980:-
1977 मध्ये भारतीय जनसंघ पक्ष निर्माण झाला होता तो पक्ष फुटला व 1980 मध्ये त्यांनी नवा पक्ष स्थापन केला याचे नाव भारतीय जनता पक्ष असे होते.
सन 1984:-
सन 1984 मध्ये बहुजन पक्षाची स्थापना करण्यात आली.
सन 1999:-
सन 1999 मध्ये अनेक काँग्रेसचे नेते बाहेर पडले व त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.
सन 1998:-
सन 1998 मध्ये ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना करण्यात आली.
सन 1966:-
सन 1966 मध्ये शिवसेना या पक्षाची स्थापना करण्यात आली.
सन 1995:-
भारतीय जनता पक्ष या पक्षाशी युती करून शिवसेना 1995 मध्ये सर्वप्रथम महाराष्ट्रात सत्तेवर आला.
सन 2019:-
सन 2019 मधील निवडणुकीनंतर शिवसेना या पक्षाने काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासोबत महाविकास आघाडी स्थापन करून हा पक्ष सत्तेवर आला.
सन 1920:-
सन 1920 मध्ये शिरोमणी अकाली दल या पक्षाची स्थापना झाली.
सन 1985:-
सन 1985 मध्ये सरकार बरोबरील वाटाघाटीतून आसाम करार करण्यात आला.
सन 1932:-
काश्मीर मध्ये जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स हा पक्षाने 1932 मध्ये स्थापन करण्यात आला.
सन 1920:-
जस्टीस पार्टी या ब्राह्मणे तर चळवळीचे रूपांतर सन 1920 मध्ये द्रविड मुन्नीत्र कळघम या राजकीय पक्षात झाले.
सन 1944:-
द्रविड मुन्नेत्र कळघम हा राजकीय पक्ष सन 1944 मध्ये जस्टीस पार्टी द्रविड कळघम म्हणून ओळखला जाऊ लागला.
सन 1949:-
जस्टीस पार्टी दरवेळी कळघम यामध्ये सन 1949 रोजी एक गट बाहेर पडला व त्यांनी स्वतंत्र द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष स्थापन केला.
सन 1972:-
स्वतंत्र द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षातून बाहेर पडलेल्या एका गटांनी सण १९७२ मध्ये ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाची स्थापना केली.
सन 1899:-
रेल्वे कामगारांनी आपल्या मागण्यासाठी सन 1899 मध्ये संप केला.
सन 1920:-
1920 मध्ये कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ही व्यापक संघटना स्थापन करण्यात आली.
सन 1960 ते 70 चे दशक:-
सन 1960 ते 70 च्या दशकात कामगार चळवळीची अनेक आंदोलने झाली.
सन 1986:-
सन १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला.
सन 1980:-
सन 1980 च्या नंतरच्या काही चळवळी झाल्या त्या चळवळींना नव सामाजिक चळवळी असे म्हटले जाते.
Also See: Maharashtra Board Class 10 History Chapter-wise Solution